प्रवीण तरडे ह्यांना ज्याप्रकारे संविधानाचा ठेका घेतलेल्या काही संघटना टीका करत धमकी देत आहेत, त्यावर तुमचं काय मत आहे?
प्रवीण तरडे हे वारंवार सांगत आहेत की त्यांचा उद्देश चांगला होता , संविधानाचा कुठल्याही प्रकारे अपमान करण्याचा हेतू नव्हता . गणपती म्हणजे विद्येची देवता व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान म्हणजे त्या विद्येचे मूर्तिमंत रूपच , असे त्याना सुचवायचे होते पण दुर्दैवाने लोकांना ही रचना आवडली नाही , सोशल मीडियावर रोष व्यक्त झाल्यावर प्रवीण तरडेनि तात्काळ जाहीर माफी मागितली व लगेच गणपती जवळून संविधान हटवले . पण आत्ता काही स्वघोषित समाजसेवक त्याना वारंवार धमकीचे फोन करत आहे , शिवीगाळ करत आहेत , मी जवळपास 5 - 6 रेकॉर्डिंग ऐकले , प्रवीण तरडे सगळ्यांशी व्यवस्थित बोलत आहेत माफी मागत आहेत , सगळ्याचे फोन त्यानी उचलले आहेत यावरून तरी लोकांनी लक्षात घ्यावे की त्याच्या मनात काहीही वाईट हेतू नव्हता . प्रविन तरडेना आज सगळा महाराष्ट्र ओळखतो , लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतो आज पुणे शहरात प्रवीण तरडे यांचा दरारा एखाद्या गँगस्टर पेक्षा कमी नाही , तरुणांची मोठी फौज त्यांच्यासोबत आहे तरीदेखील त्यानी हे प्रकरण सामंजस्याने घेतले आहे . व त्यानी लगेच जाहीर माफी मागितली असल्याने हे प्रकरण इथेच थांबायला हवे .
अनिरुद्धजी मग तरडेंनी त्या गॅंगस्टरच्या जीवावर हे पाऊल उचलले आहे अशीही शंका उपस्थित केली जाऊ शकते. आणि त्यांनी ते पाऊल उचलले नाही म्हणून त्यांचा हाच मोठा मोठेपणाच म्हणावा लागेल होय ना?
आपण काय संदेश देतात किंवा सूचना करतात याचे भान आम्हाला आहे बरं कुलकर्णी साहेब.?
नकळत किंवा चुकून झालं असं आतापावेतो माझी धारणा होती परंतु तुमच्या बोलण्यातून आणि मतांमधून हे पूर्वनियोजित पाणी हेतूपुरस्सर केल्याचेच समजते.
त्यांनी केलेल्या निंदनीय गोष्टीचं समर्थन करत आहात. अर्थात त्यांना जे वेडेवाकडे बोलतात ते ऐकून मलाही वाईट वाटतं त्यांनी माफी मागितली हेही पर्यंत प्रकरण संपले या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
परंतु तुम्ही जे काय बोलत आहात, वक्तव्य करत आहात त्या दृष्टीनं एक लक्षात घ्या की तुमची भावनाच मुळात निर्मळ स्वच्छ आणि चांगली आहे असं समजणं धोक्याच आहे हे तुम्हीच निदर्शनास आणून देत आहात.
एकंदरीत तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हेच स्पष्ट होत आहे.
संविधानाचा ठेका घेतलेल्या काही विशीस्ट वर्गाला हे माहीत नाही की संविधान हे संपुर्ण भारतीय जनतेचे आहे.

Comments
Post a Comment