प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली?

प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली?

प्रवीण तरडेंकडून सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे त्यांनी संविधान घरात ठेवले. कारणे बघा…

त्यात संविधानाचा अपमान झाला का ?

जर आरास करण्याचा हेतू चुकीचा असता तर संविधानाचा नक्कीच अपमान झाला असता. त्यांची संकल्पना होती की पुस्तक बाप्पा पुस्तक. ही काही नवीन नाही मात्र इतर सर्व पुस्तकांत बाप्पाला सर्वात जवळचे म्हणजे संविधान. संविधानावरील श्रद्धा आमची बाप्पा सारखी आहे (नक्कीच बाप्पा वरील श्रध्दा चांगली त्याचप्रमाणे संविधानाची.) हे त्यांना दर्शवयाचे होते. एव्हाना आम्ही आज बाप्पा पूजतोय तो संविधानाच्या महत्तेमुळेच हे बोध दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र झालं ते उलटंच अन अजून अंगावर आले. पण ज्या हेतूने त्यांनी caption दिले होते तो नक्कीच वाईट नव्हता ( आज आमच्या घरी पुस्तक बाप्पा पुस्तक… यात कुठेही संविधान विरोधी विधान नव्हते.) त्यामुळे संविधानाचा अपमान झाला असे एक वर्ग सोडून इतर कोणालाही जाणवले नाही- कारण भावना शुद्ध होती.

संविधानाचा अपमान झाला असे का वाटले ?

घटित प्रकरणात फक्त एका विशिष्ट समाजवर्गाला गणपती ठेवल्याने अपमान झाला असे वाटत आहे. मात्र इतर समाजाच्या दृष्टिकोनातून ही सर्वसामान्य बाब आहे. मग यात चुकीचे कोण विरोध करणारा की न करणारा ? मुख्यतः मला यात चूक दोन्ही वर्गांची वाटत नाही. कारण

  1. पहिला वर्ग असा आहे, ज्याला सर्व हक्क संविधानाने दिले आहेत, जे २५०० वर्षांपासून वंचित होते. अश्या वर्गाला जर एक ग्रंथ नवजीवन देऊ शकते तर तो ग्रंथ नक्कीच हा त्यांच्यासाठी सामान्य नसेल. शिवाय बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञेनुसार व त्यांची पार्श्वभूमीनुसार देवतांवरील श्रद्धा त्यांना नाही, त्यामुळे त्यांचा जीवनदाता संविधान ग्रंथावर देवता ठेवल्याने तो अपमान झाला असे त्यांना वाटत आहे.
  2. दुसरा वर्ग म्हणजे ज्यांना आधीपासून सर्व हक्क होते मात्र समानता ज्या ग्रंथाने निर्माण केली तो ग्रंथ हिंदूं-मुस्लिमसाठी तितकाच मोलाचा आहे. शिवाय दुसऱ्या वर्गाला गणपती हा किती प्राणप्रिय व लाडका आहे हे सर्वज्ञात आहे. अश्या लाडक्या, प्रेमळ, श्रद्धास्थान जवळ दुसरे श्रद्धास्थान ठेवणे म्हणजे द्विगुणित श्रद्धा निर्माण होणे हाच भाव दुसऱ्या सामाजाच्या मनात आहे. त्यामुळे संविधानाच्या वर गणेश ठेवणे म्हणजे संविधानावर श्रद्धा ठेवणे हीच भावना दुसऱ्या वर्गाच्या मनात आहे. म्हणूंन दुसऱ्या वर्गाला यामुळे संविधानाचा अपमान झाला, असे काहीही वाटत नाही.

कायदेशीर बाजूने हे प्रकरण ?

भारतीय दंड संहिता की धारा 124 A के अनुसार, जो भी लिखित या फिर मौखिक शब्‍दों, या फिर चिन्‍हों या फिर प्रत्‍यक्ष या अप्रत्‍यक्ष तौर पर नफरत फैलाने या फिर असंतोष जाहिर करने पर देशद्रोह का मामला दर्ज किया जाता है।

इसके तहत दोषी को 3 साल से लेकर उम्रकैद तक की सजा हो सकती है साथ ही जुर्माना भी लगाया जा सकता है।[1]

याप्रमाणे प्रवीण तरडेंनी राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केलेला नाही शिवाय त्यांनी पोस्ट् टाकताना संविधानाचा अपमान होईल असे कोणतेही विधान, कृत्य केलेले नाही. एव्हाना पुस्तक विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे. IPC 124 (A) चा खटला हा सरळ उच्च व सर्वोच्च न्यायालयात चालतो. त्यामुळे जर न्यायालयाला कायदेभंग आढळेल तर नक्कीच त्यांनी प्रवीण तरडेंवर कारवाई चालवावी.

प्रवीण तरडेंनी माफी मागीतली तरी प्रकरण का वाढलं ?

तरडेरावांनी माफी मागताना “मी एका ***समाजाच्या लोकांची भावना दुखावल्या ने माफी मागतोय” असे वक्तव्य केले त्यामुळे हे प्रकरण अधिक चिळघळले आहे. खरं तर एका बाजूने पाहिल्यास या वक्तव्यात काहीही चूक नाही. कारण एक विशिष्ट वर्ग सोडून दुसऱ्या कोणताही समाजाला काही जाणवले नाही. त्यामुळे ज्या वर्गाच्या भावना दुखल्या फक्त त्याच वर्गाची माफी मागितली एवढेच मग सर्व भारतीय फक्त एका विरोधकर्त्या वर्गामध्ये कसे येतील. जर सर्व भारतीय व भारतातील समाजाने प्रवीण तरडेंना विरोध केला असता तर त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागणे बंधनकारक होते. त्रास फक्त एकाच वर्गाला असल्याने त्यांनी फक्त एकाच वर्गाच्या भावनांबद्दल माफी मागितली त्यात गैर काहीही नाही.

मात्र संबंधित वर्गाची अशी समजूत दाखवण्याचा प्रयत्न आहे की, त्यांना दुःख झाले म्हणजे सर्व भारतीयांना दुःख झाले. यामुळे गल्ली बोळातील छोट्या मोठ्या संस्थांचे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा माफीवर प्रकरण न थांबवता मोठमोठ्या धमक्या देत आहेत. …


संविधान हे इतके पवित्र आहे की, जगातील कोणत्याही गोष्टीने त्याचे पावित्र्य भंग होणर नाही अथवा अपमानित होणार नाही. शिवाय संविधान हा एका विशिष्ट वर्गाचा धर्मग्रंथ नाही त्यामुळे याप्रकरणी त्यांनी कायदा हातात घेऊन संविधान वाचवण्याचे सोंग करत त्याच संविधानाला पायमल्ली आणू नये. खरं तर संविधानाचा खोटा पुळका बाळगत गणेशोत्सव व हिंदू सणांचा तिटकारामुळे प्रवीण तरडेंनी माफी मागून सुद्धा मंडळी वाद सोडायला तयार नाहीत.

प्रविण तरडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही? शूटिंग करू देणार नाही ? अश्या बऱ्याच धमक्या गल्ली-बोळातील संविधान बचाओ संघटना देत आहेत. मात्र ते इतका ही विचार करीत नाही की, संविधानाने सर्वांना मूलभूत हक्कात संचार व मनोरंजन करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. कायदा हातात का घेतात ? सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का ? जर नसेल तर संविधानावर सुध्दा विश्वास नाही. कारण सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या संरक्षणाचे प्रतिनिधित्व करते.

भारताला राष्ट्रीय ग्रंथ नाही. राष्ट्रीय चिन्हात वाघ, अशोक चक्र, वाघ, मोर, तिरंगा असला तरी भारतीय संविधान राष्ट्रीय चिन्हात येत नाही. अन संविधान जोपासण्याच्या इतक्याच अटी-तटी असतील तर सामान्य जनता संविधानाला हात लावायला ही घाबरेल. त्याला इथेच ठेवा असे ठेवू नका, असेच वाचा असे वाचू नका इतक्या अटी लादल्यावर अन हे प्रकरण पाहून संविधान घरात ठेवणे किती जोखमीचे आहे, असे वाटू लागलंय. अन याने खरंच संविधान घरोघरी पोहचेल का ? हा विचार करावा

संविधानावर वाढती मक्तेदारी इतर समाजाला संविधानापासून अधिक दूर लोटत आहे. संविधान सर्वांचे आहे, सर्वांना संविधान संरक्षणाची काळजी आहे. पण त्याच्या बचावासाठी स्वतः कट्टरवाद ओढवणे व मूलभूत हक्कांवर जबरीने बंधन घालणे हे संविधानाच्याच नियमांचे उल्लंघन आहे.

जय हिंद

चैतन्य

तळटीपा

    Comments